Satyamev Jayateमहाराष्ट्र शासन * ग्राम विकास विभाग * जिल्हा परिषद * wai

आमचा इतिहास

आमच्या गावाचा समृद्ध इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा

रायगड इतिहास

शिवाजी महाराजांनी वसवलेले गाव म्हणजे रायगड. रायगड,म्हणजे ? मेट म्हणजे नाका अफजलखान भेटीच्या वेळी सर्व बाजूला नजर ठेवता यावी म्हणून नाका बसवला होता.आज जेथे मंदिर आहे तेथून थोडे दूर शिखर आहे. त्यावरून कृष्णा खोरे व उजव्या बाजूला वेण्णा खोरे दिसते तर पश्चिम बाजूला क्षेत्रमहाबळेश्वर पर्यंतचा परिसर दिसतो.असे ऐताहासिक गाव आहे.त्याचा उल्लेख शिवचरित्रात सापडतो. वस्ती तयार झाल्यामुळे तेथे मेटगुताड गावाचे ग्रामदेवतेचे मंदिर स्थापना करण्यात आली.त्याबद्दल आज हि एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी पूर्वी आजच्या ठिकाणी मंदिर आहे तेथे एक गाय दररोज येऊन तेथील पाषाणावर दुधाचा अभिषेक करत होती.तेव्हा तेथे आमच्या पूर्वजांनी ते पाहिले आणि त्याला आश्चर्य वाटले.पण ती गाय रोजच येते हे पाहून तेथे छोटेसे मंदिर निर्माण केले .पुढे ग्रामस्थांनी सुंदर मंदिराची निर्मिती केली.आज मंदिराचा परिसर व मंदिर पाहण्यासाठी व यात्रेच्या वेळी लाखो भाविक येतात.नवसाला देवी पावणारी म्हणून प्रसिद्ध आहे. गावालगतच असणारा वेण्णा नदीवर लिंगमळा धबधबा हा महाराष्ट्रात सर्वात मोठा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा उंचावरून पाण्याचा पडणारा प्रवाह त्यातून निर्माण होणारे धुके व तुषार याने तो धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. वेण्णा नदीत पाण्यात भिजण्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी छोटा कुंड व त्यावरून पडणारा छोटा धबधबा हा पर्यटकांना आकर्षित करतो.तसेच Selfi Point म्हणून प्रसिद्ध आहे. नदीपात्रात पाण्यात पोहण्यासाठी व जाण्यासाठी सुरक्षित आहे. वेण्णा नदीवर लवासा सारखे छोटा बंधारा बांधला आहे. त्यावर पायऱ्या टाकून त्यावर पाण्यात बसून जलक्रीडा करता येते. हा परिसर वनश्रीने नटलेला असून विविध प्रकारच्या वनस्पती येथे आढळतात.विविध पक्षी हंगामानुसार पाहवयास मिळतात.यामुळे वन्यजीव व वनस्पती अभ्यासकांना हा परिसर खूपच महत्वाचा वाटतो.महाबळेश्वर येथे येणारे सर्व पर्यटक हे धबधबा व परिसर पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात.

गावाचा भौगोलिक वैशिष्यपुर्ण स्थान

गावाचा भौगोलिक वैशिष्यपुर्ण स्थान, गावाचा भौगोलिक वैशिष्यपुर्ण स्थान, गावाचा भौगोलिक वैशिष्यपुर्ण स्थान

About Our Village

गावातील सामाजिक एकोपा

गावातील सामाजिक एकोपा गावातील सामाजिक एकोपा गावातील सामाजिक एकोपा

Village History

काळाचा प्रवास

गावाच्या विकासाची मुख्य टप्पे

१९६३

ग्राम पंचायत स्थापना

ग्राम पंचायत स्थापना करणेत आली

१९३६

जिल्हा परिषद शाळा सुरु

पहिली जिल्हा परिषद शाळा सुरु,आदर्श शाळा महणून तालुक्यात रायगड ची शाळा म्हजे जिल्हा परिषद केंद्र शाळा म्हणून ओळखली जाते

२००४-२००५

सातारा जि.परिषद सातारा संपूर्ण स्वच्छता अभियान पुरस्कार प्राप्त

स्वच्छतेचा पहिला पुरस्कार मिळाला

२०१०

स्मार्ट ग्राम पुरस्कार

स्मार्ट ग्राम पुरस्कार

२०१६-१७

दीन दयाळ उपद्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार

दीन दयाळ उपद्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार

२०१६-१७

स्मार्ट ग्राम पुरस्कार

स्मार्ट ग्राम पुरस्कार

२००६

निर्मल ग्राम पुरस्कार

निर्मल ग्राम पुरस्कार

२०१०-११

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत पुरस्कार

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत पुरस्कार